स्वातंत्र्य पंच्याहत्तरी - मधुकोष 🇮🇳
नमस्कार, दरवर्षी प्रमाणे यंदाचा ७५ व अमृत महोत्सवी स्वातंत्र्योत्सव मधुकोष मध्ये साजरा करण्यात आला. २०२२ चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त, संकुलामधील डॉ. विजयकुमार डोंगरे, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री पराग भिडे आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या - संस्कार भारती- साहित्य विधा अखिल भारतीय समिती सदस्य आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रसिद्धी संयोजक, पत्रकार, माध्यम अभ्यासक डॉ नयना कासखेडीकर यांच्या हस्ते झेंडावंदन, 🇮🇳 राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
तत्पश्चात संकुलामधील विविध कलाकारांनी गायन कौशल्य सादर केले यात ज्येष्ठ भजनीमंडळाकडून 'संस्कृत गीत' गायन करण्यात आले. सौ. गायकवाड यांचे एकल गीत, गायक कलाकारांचे ससंगीत संपूर्ण वंदेमातरम यांनी बहार आणली.
सांस्कृतिक वार्तापत्राच्या 'फाळणीच्या वेदना' या विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले, या प्रसंगी श्री अजय जोशी, कोषाध्यक्ष, सांस्कृतिक वार्तापत्र यांनी मनोगत व्यक्त केले.
संकुलामधील सामाजिक उपक्रमांची माहिती देत असताना श्री करजगी यांनी 'प्लास्टिक कचरा संकलन व विघटन त्याचप्रमाणे रद्दी संकलन, तसेच श्री क्षीरसागर यांनी 'एक मुष्ठी अमृत धान्य संकलन' योजना सविस्तर सांगितली.
"कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ नयना ताई यांनी ''स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी'' हा अभिवाचन कार्यक्रम सादर केला. हे अभिवाचन अत्यंत भावविभोरपणे तर होतेच शिवाय विविध कवींच्या प्रेरणादायी रचना ऐकवून तत्कालीन समाजामध्ये कवींनी घडवून आणलेल्या जागृतीचा उजाळा त्यांनी करून दिला."
कार्यक्रमाच्या ठिकाणी 'भारतीय विचार साधना' प्रकाशन पुणे च्या विविध देशभतीपर विषयांच्या पुस्तकांचे केंद्र देखील ठेवण्यात आले होते.
संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे पिनाक सौ. अनघा रानडे यांनी समर्थपणे पेलले.
भारत माता पूजन 🙏🏻 व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
भारत माता कि जय!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳कार्यक्रमाची क्षणचित्रे





.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)